




SERVE TO CHANGE LIVES
OCTOBER 2021 Issue Economic and Community Development Month
पामवुड गडाची मोहीम
आपल्या राज्यात अनंतचतुर्दशीच्या पावन दिवशी विशेष मोहीम काढण्याचा प्रघात आहे. हा नेहमी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याचबरोबर भरपूर 'दंगा' करायला मिळतो म्हणून सर्व चातक पक्षासारखी आतुरतेने वाट पाहतात.
गेले दीड वर्ष करोना नावाच्या मुघल बादशहाने सर्व नागरिकांना आपल्या कारागृहात कोंडून ठेवलं होतं. या जुलमी बादशहाचा भर आणि जोर जरा ओसरल्यावर सर्व सरदार, फर्जंद आशेने कारागृहातून मुक्तता मिळण्यासाठी कारण शोधत होते. राज्याच्या शोभाराणीसाहेबांनी "ही मोहीम कोण फत्ते करणार" अशी विचारणा करून सर्व बिनीच्या सरदारांमध्ये विड्याचे तबक फिरवले असता सरदार नितीनजी नाईक यांनी या मोहिमेचा विडा उचलला.
सर्व सरदार व प्रजाजन सरदार नितीनजी नाईक यांच्याकडे आशेने बघू लागले. स्वतःच्या एका परगण्याची जबाबदारी सांभाळून हा सरदार मोठ्या उत्साहाने मोहिमेवर जाण्यास तयार होता आणि पाहता पाहता त्याने कुठे मोहिम काढायची हे ठरवूनही टाकलं- 'पामवुड' गड. आपापल्या गढीमध्ये आतापर्यंत बंदी असलेल्या इतर अनेक सरदारांनी १९सप्टेंबरला मोहिमेवर जायचं हे कळल्यावर आवेशाने शस्त्रसज्ज होऊन तयार असल्याचे कळवले. मोहिमेस येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे मोहीमेवर जाण्याच्या स्थळावर छावण्या उभारण्याकरता जागा कमी पडू लागली. मग काय, मुक्कामाकरता अजून एका नजीकच्या 'देहम' नामक प्रेक्षणीय गढीची निवड करण्यात आली. या मोहिमेवर २६ सरदार कुटुंबासह सामील झाले. मात्र राज्य सांभाळण्यासाठी काही सरदार राज्यात ठेवणे क्रमप्राप्त होते. तरी एकूण ५१ जण या मोहिमेवर आले होते.
या मोहिमेस रसद पुरवण्याचे काम सरदार सतीशजी रावेतकर यांनी पदरमोड करीत स्वतः हून अंगिकारले व संपूर्ण मोहिमेस "दारू" गोळा कमी पडणार नाही याची चोख तजवीज केली. सरदार नितीनजी यांनी मोहिमेसाठी लागणारा हा सर्व "दारू"गोळा वाहून नेण्याची व्यवस्था स्वतः लक्ष घालून इतर सरदारांच्या मदतीने केली.
मोहीम सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी राणीसाहेब स्वतः राजेसाहेबांसह जातीने एक दिवस आधी स्थळ-पाहणी करण्याकरता त्यांचे सचिव व एक वरिष्ठ सरदार यांच्या कुटुंबियांसह रवाना झाल्या. सर्व नियोजन योग्य केले आहे हे बघून राणीसाहेबांनी सरदार नितीनजी यांच्या कौशल्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले.
"पामवुड" आणि "देहम" हे दोन गड छावण्या उभारण्याकरता निश्चित झाले आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या छावणीचे स्थान निश्चित करण्यात आले. मोहिमेचे अत्यंत सुसूत्र नियोजन हा सरदार नितीनजी यांचा हातखंडा. छावण्यांमध्ये जाण्याच्या आधी सर्व सरदारांचे यथायोग्य स्वागत करण्यात आले. काही उत्साही सरदारांनी वेळेचा अपव्यय ना करता गेल्या गेल्या बरोबर नेलेला "दारू"गोळा बाहेर काढून कसून सराव करण्यास सुरुवात केली.
नंतरची सामिष व निरामिष भोजनाची व्यवस्था, दुपारच्या वामकुक्षीची व्यवस्था, नंतर अश्वारोहण, धनुर्विद्या, नेमबाजी इ. शस्त्रविद्या सराव, संध्याकाळी सर्व सरदार कुटुंबीयांचे एकत्र येऊन साजरे करण्याचे मनोरंजनाचे कार्यक्रम, नंतर विविध सरदार कुटुंबियांनी संगीताच्या तालावर सादर केलेली नृत्यकला व त्यानंतर संगीताच्या "सुरां"चा व "सुरे"चा अनुपम संगम घडवून आस्वाद घेता घेता जमवलेली "spirit"ual बैठक यामुळे ही संध्या अनेकांना एका वेगळ्याच "उंची"वर घेऊन गेली.
या प्रत्येक ठिकाणी सरदार नितिनजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत क्षणोक्षणी दिसत होती.
सरदार नितीनजी व त्यांचे अन्य सहकारी "देहम" येथील छावण्यांमध्ये "पामवुड" या प्रमुख स्थळावरून १९ तारखेचा प्रमुख कार्यक्रम संपल्यानंतर मुक्कामाकरता रात्री रवाना झाले. तिथे नंतर मध्यरात्री बारानंतर सुमारे दोन तास आढावा बैठक झाली व त्यामध्ये सरदार नितीनजी यांनी सर्व सहकाऱ्यांना त्यांचे श्रम घालवण्याकरता आयुर्वेदिक अभ्यंगस्नान व त्यांचे अनुभव याचे महत्व सांगितले. हे दोन तास म्हणजे "वेगवेगळ्या प्रकारे कसे हसावे" याचा एक छोटासा अभ्यासवर्ग होता. या छावणीमध्ये एका परराज्यातल्या हेराचे अचानक आगमन झाले. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री यांच्याकडून या परदेशी हेरास राज्याची गुपिते जाणून घेण्याची फार इच्छा होती. मात्र त्या हेरास ओळखून तातडीने छावणी परिसरातून बाहेर काढण्यात आले. मंत्रिजीनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर हा हल्ला परतवून लावला.
दुसऱ्या दिवशी सकाळी काही जणांनी निसर्गभ्रमंती करावयाचा आनंद घेतला. नंतर सर्वांनी एकत्र न्याहारीचा कार्यक्रम करून आपापल्या परिवारांसह अत्यंत आनंदाने परत राज्याकडे कूच केले.
थोडक्यात जवळपास दीड वर्षानंतर राज्यातील बहुतांश सरदार व प्रजाजन यांनी एकत्र येण्याचा आनंद घेतला व लवकरच नवीन मोहिमेवर जाण्याचा संकल्प सोडला. ही नवीन मोहीम विदेशी मुलुखात काढावी असे काही सरदारांनी सुचविले. शोभाराणीसाहेब यांनी यावर सखोल विचार करण्याचे आश्वासन दिले.
सरदार नितीनजी यांनी ही मोहीम प्रमाणाबाहेर फत्ते केली आणि आपली ख्याती परत एकदा सिद्ध केली.
सरदार(जी) अजयजी
रिसॉर्ट




धनुर्विद्या




नेमबाजी




संगीतमय संध्या




धमाल




नाश्ता




भावमुद्रा




पुढचा विडिओ पाहण्यासाठी उजवीकडॆ स्वाईप करा

RCPS Club Trip Sep 2021
साप्ताहिक कार्यक्रम
Felicitation of teachers on the occasion of Teachers’ Day
September 5, the birth anniversary of Dr. Sarvepalli Radhakrishnan, first Indian Vice-President and 2nd President of Republic India, is celebrated in India as Teachers’ Day, Tecahers’ Day is observed in our club by greeting all the teachers in the club and also by felicitating teachers from various walks of life. On 5th September, 2021, an e-greeting card was sent to all the teachers in the club to thank them for their contribution in shaping the future of students. On 6th September 2021, during the weekly meeting, teachers from the club were felicitated. In addition, the club also honoured three teachers, viz., Shri Ashok Rupner from Science Activity Centre, IISER Pune, Ms. Mrunal Gunjal, primary teacher from Z.P. primary school, Pimpalgaon Tarfe Mahalunge, Tal. Ambegaon, Dist Pune and Ms. Reshmi Pardeshi, teacher of special children.
Ashok Rupner is M.Sc. Physics and B.Ed. and is involved in science popularization among students and teacher. He travelled all over Maharashtra and conducted over 3000 hands-on workshops in various schools. For four years in a row, he won the science activities award at Sci-fest Africa in South Africa during 2008-2012. While working at IUCAA up to 2017, he designed hundreds of science and mathematics teaching experiments and models. He and his team made about 1100 short videos on low cost models, science activities and toys. These have been translated in many Indian languages. Since 2017 he is working at IISER Pune and is setting up a science activity centre and conducted over 400 in-person and reached to over 70,000 people. During the situation created by COVID-19 pandemic he conducted over 50 online sessions on YouTube Live and reached to over 1.6 million students.
Ms. Reshmi Pardeshi obtained her B.Com degree in 1995. Very early in her life, she decided to work for special children and obtained Diploma in Secondary Education (Hearing Impaired) (D.S.E. (H.I) and B.Ed for hearling impaired. From 2006 to 2017 she worked as special teacher under Sarva Shiksha Abhiyan in the remote areas of Velhe Panchayat. In 2017 she joined PMC’s Education office at Aundh and is associated with 80 schools in teaching special children. In addition, she also helped several hearing impaired children to regain hearing ability by arranging their treatment through donations from various agencies.
Ms. Mrunal Ganjale
Mrunal Ganjale is working as primary school teacher at Z.P primary school at Pimpalgaon Tarfe Mahalunge, Tal. Ambegaon, Dist. Pune for the last 12 years. She is extensively using ICT tools for engaging both teachers and students in teaching activities. These include on-line teaching, interacting with students from other countries, use of website and mobile applications. During the COVID 19 pandemic, she has employed online teaching tools. Many of her students qualified for scholarships and got admission in Navodaya Vidyalaya. She believes in tuning the teaching methods to changing times. She was recognised for her efforts through NCERT, New Delhi, for the MoE 2019 national award for use of ICT tools in teaching. In 2019, she was selected for the Under World Education Exchange Program of Microsoft at Sydney, Australia. She received third prize in NCERT and DIAT sponsored New Initiatives competition. She has also been selected as a member of the State Education Officers Think Tank
Our club is proud to have recognized and honoured these teachers.
Rtn. Suryaprakasa Rao
.jpg)




१३ सप्टेंबर - विनय साठे श्रद्धांजली सभा

मित्रांनो,
विनय जाण्याची दुःखद व धक्कादायक बातमी १३ सप्टेंबर रोजी आपल्याला समजली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक खास अंक प्रसिद्ध करण्याबद्दल प्रेसिडेंट शोभाताई यांनी सूचना केली. त्यानुसार सर्वांना आवाहन केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या जवळ असलेले फोटो, व्हिडिओ, ऑडियो क्लिप्स पाठवले. आठवणी लिहून पाठवल्या. त्या सर्व संकलित करून एक स्मरणिकारूपी पुश दिनांक २२ सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला.
त्याची लिंक खाली दिलेली आहे.
२७ सप्टेंबर - जीवनगाणे
गेल्या सोमवारी म्हणजे २७ सप्टेंबर रोजी "जीवनगाणे" हा कार्यक्रम आपल्या क्लबमध्ये सादर झाला. आपल्या क्लबच्याच सभासदांनी हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने सादर केला. सीमाताई महाजन, राहुल पेंढारकर आणि आशिष नेर्लेकर यांनी प्रस्तुत केलेल्या बहारदार गाड्यांमुळे संपूर्ण हॉल भारावून गेला. जीवनावर आधारित गाणी - ए जिंदगी गले लगा ले, जिंदगी कैसी है पहेली, माझे जीवन गाणे अशा अनेक बहारदार गाण्यांमुळे सारे श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले. मृणाल ताई व कल्याणी ताईंच्या साभिनय आणि खुसखुशीत निवेदनाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्याबरोबरच उपाध्ये सरांची सिंथेसायझरवरची सुरेल साथ. एकूणच संपूर्ण कार्यक्रम अतिशय छान प्रकारे संपन्न झाला.
ऍन. पल्लवी कापरे




पुढचा विडिओ पाहण्यासाठी उजवीकडॆ स्वाईप करा